Friday 24 May 2013

Inflation-linked bonds

  • A bond that guarantees a return higher than the rate of inflation if it is held to maturity. 
  • Inflation-indexed bonds pay a periodic coupon that is equal to the product of the inflation index and the nominal coupon rate.
  • The relationship between coupon payments, break-even inflation and real interest rates is given by the Fisher equation.
  • A rise in coupon payments is a result of an increase in inflation expectations, real rates, or both. 
Why in News:
  • Finance Minister P. Chidambaram in the Union budget for 2013-14, the government, in consultation with the Reserve Bank of India (RBI), decided to launch Inflation Indexed Bonds (IIBs) to wean away investors from the yellow metal (Gold) to paper-based savings instruments.

  • To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

Sexual Harassment Bill, 2013

image from THE INDIAN EXPRESS

  • It was passed by the Lok Sabha on 3 September 2012.
  • It was passed by the Rajya Sabha on February 26, 2013.
  • The Bill got the assent of the President on 23 April 2013.
Salient features of the Bill:
  1. The Bill provides protection not only to women who are employed but also to any woman who enters the workplace as a client, customer, apprentice, and daily wageworker or in ad-hoc capacity.
  2. Students, research scholars in colleges/university and patients in hospitals have also been covered.
  3. Bill seeks to cover workplaces in the unorganised sectors.
  4. The Bill proposes a definition of sexual harassment, which is as laid down by the Hon'ble Supreme Court in Vishaka v. State of Rajasthan (1997). 
  5. The Bill provides for an effective complaints and redressal mechanism.
  6. Employers who fail to comply with the provisions of the proposed Bill will be punishable with a fine which may extend to 50,000. 
  7. The Complaint Committees are required to complete the enquiry within 90 days and a period of 60 days                                                              
  8. To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

Thursday 23 May 2013

Current Affairs Package- 6


  1. Sachin Tendulkar made his television debut in an animation series called “Master Blasters”
  2. “MY World” is a global survey for citizens, led by the United Nations and partners.
  3. India's first passenger train journey took place on 16 April 1853, it was hauled by three locomotives, Sahib, Sindh, and Sultan.
  4. World Malaria day = 25 April
  5. President Pranab Mukherjee travelled to be the chief guest at Mauritius’ National Day celebration. 
  6. “The Test of My Life” The autobiography by Yuvraj Singh
  7. 2013 has been designated as the UN International Year of Water Cooperation. 
  8. Sikkim Scouts is the Indian Army’s newest infantry regiment, which the Army hopes to raise by 2015.
  9. International decade for Action 'Water For Life'= 2005-2015
  10. C-DAC Pune launched Param Yuva II, the fastest supercomputer in India and 62nd fastest in the world, on February 8, 2013.                                              
  11. To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

World Hunger Map 2012






    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

World Malaria Report 2012




  • The World Malaria Report 2012 summarizes information received from 104 malaria-endemic countries.
  • It highlights the progress made towards the global malaria targets set for 2015, and describes current challenges for global malaria control and elimination.
  • According to the latest WHO estimates, there were about 219 million cases of malaria in 2010 and an 
  • estimated 660000 deaths.
  • Africa is the most affected continent: about 90% of all malaria deaths occur there.
  • Malaria remains inextricably linked with poverty.
  • The highest malaria mortality rates are being seen in countries that have the highest rates of extreme poverty.
  • In South East Asia, the second most affected region in the world, India has the highest malaria burden (with an estimated 24 million cases per year), followed by Indonesia and Myanmar.
  • Antimalarial drug resistance is a major concern for the global effort to control malaria.
  • In May 2012, WHO and the Roll Back Malaria Partnership released the Global Plan for Insecticide Resistance Management in malaria vectors, a five-pillar strategy for managing the threat of insecticide resistance.

About India:

  • India has the highest number of cases in the region, is projected to achieve decreases of 50-75 per cent in malaria case incidence by 2015.
  • India has been taking measures like providing insecticide-treated mosquito nets (ITNs) and long-lasting insecticidal nets in affected areas.
  • India, Nepal and Thailand could also potentially move from the “control” to the “pre-elimination” phase by continuing their progress.


    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in


Ricin


Castor Beans
  • It is a highly toxic, naturally occurring carbohydrate-binding protein of the type known as lectins.
  • Ricin is a poison found naturally in castor beans.
  • If castor beans are chewed and swallowed, the released ricin can cause injury.
  • Ricin can be made from the waste material left over from processing castor beans.
  • It can be in the form of a powder, a mist, or a pellet, or it can be dissolved in water or weak acid.
  • Castor beans are processed throughout the world to make castor oil.
  • Ricin is part of the waste “mash” produced when castor oil is made.
  • Ricin has been used experimentally in medicine to kill cancer cells.
  • Ricin poisoning is not contagious.
  • Ricin-associated illness cannot be spread from person to person through casual contact.
  • However, if you come into contact with someone who has ricin on their body or clothes, you could become exposed to it.
  • Ricin works by getting inside the cells of a person’s body and preventing the cells from making the proteins they need.
  • Without the proteins, cells die.
  • Eventually this is harmful to the whole body, and death may occur.
  • Effects of ricin poisoning depend on whether ricin was inhaled, ingested, or injected.
  • There is no antidote for ricin poisoning.
  • If you are exposed, you will need to get the ricin off of your body as quickly as possible.
WHY IN NEWS:
  • In April 2013, letters sent to US President Barack Obama and a Mississippi Senator had tested positive for being laced with ricin.  
  •                                                 To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे

चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पुरस्कार 2012


  • राज कपूर जीवनगौरव पुरस्कार = ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक बासू चॅटर्जी
  • चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार = ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरीनाथ जुकर
  • राज कपूर विशेष योगदान पुरस्कार = नाना पाटेकर
  • चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार= रिमा लागू


    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

Wednesday 22 May 2013

घातक कचरा निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल


  • धोकादायक व प्रदूषणयुक्त कचरा व टाकाऊ सामग्री निर्मितीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
  • देशात वर्षभरात तयार होणाऱ्या 79 लाख टनांपैकी राज्यातील कचऱ्याचा वाटा सर्वाधिक 22.84 टक्के इतका असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे म्हणणे आहे. 
  • महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात (22.68 टक्के) आणि आंध्र प्रदेश (13.75) यांचे क्रमांक आहेत.
  • महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, मध्य प्रदेश व छत्तीसगड ही सात राज्ये मिळून देशातील 82 टक्के प्रदूषणयुक्त कचऱ्याची निर्मिती करतात. 
  • सिमेंट, वीजनिर्मिती, पोलाद उद्योग आणि कालबाह्य टाकाऊ संगणक हे या घातक प्रदूषणयुक्त कचऱ्याच्या निर्मितीचे प्रमुख स्रोत आहेत.
  • कचऱ्यावरील प्रक्रिया करणारे प्रकल्प 16 राज्यांमध्ये उभारण्यात आले आहेत.
  • महाराष्ट्रात असे तीन प्रकल्प आहेत. 
  • धोकादायक कचरा... 
  • देशात वर्षभरात तयार होणारा कचरा =79 लाख टन
  • महाराष्ट्राचा वाटा=22.84 टक्के 
  • कचऱ्यावर प्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील प्रकल्प=3 
  • सात राज्यांकडून होणारी कचऱ्याची निर्मिती =82 टक्के      

    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

Tuesday 21 May 2013

एलबीटी

जकातीऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) या नावाने हा कर बसविण्यात आला आहे.
जकातीत कर वसूल करण्याची पद्धत होती, तर एलबीटीमध्ये व्यावसायिकांना कर भरावा लागणार आहे. विक्रीकर विभागाकडे सादर केलेल्या लेखाच्या आधारे हा कर लागू होणार आहे.
राज्यात "ड' व "क' वर्ग महापालिकांमध्ये एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यात जकातीतून सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱ्या मुंबई महापालिकेत 1 ऑक्‍टोबरपासून "एलबीटी' लागू होणार आहे.
महाराष्ट्रातील 24 महापालिकांमध्ये जकात कर वसूल केला जातो.
जकात करपद्धती रद्द करावी, अशी मागणी उद्योजक, व्यापारी संघटनांची होती.
त्यानुसार जकातीला पर्याय म्हणून शासनाने नियुक्त केलेल्या कसबेकर समितीने प्रवेशकराचा पर्याय सुचविला.
2006 च्या अभ्यासगटाने अतिरिक्त व्हॅट, भांडवली किमतीवर मालमत्ता कर, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र व्यवसाय कर, प्रवेशकर असे पर्याय सुचविले.
अन्य पर्यायांच्या तुलनेत प्रवेशकर हाच योग्य पर्याय असल्याचे सांगत महापालिकांमध्ये प्रवेश उपकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी मुंबई महापालिकेत 1996 मध्ये सर्वप्रथम हा कर लागू झाला.
त्यानंतर ऑक्‍टोबर 2008 ला "ड' वर्ग 19 महापालिकांमधील जकात कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु, प्रचंड विरोधामुळे एका महिन्यातच जकात वसुली पूर्ववत करण्यात आली.
त्यानंतर पुन्हा एकदा 2010 मध्ये एलबीटी लागू करण्यास सुरवात झाली
राज्यातील "ड' वर्ग महापालिका क्षेत्रात जकात रद्द करण्यात आली. त्यानंतर आता शासन टप्प्या टप्प्याने एलबीटी कर लागू करीत आहे.
महापालिकेची भूमिका 
राज्य शासनाने "ड' व "क' वर्ग महापालिकांमध्ये एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेतही 22 जूनपासून कर लागू होणार आहे. एलबीटी करप्रणालीत आयुक्त सर्वेसर्वा आहे. म्हणजे, कराचे दर ठरविण्यापासून ते तपासणीपर्यंत सर्व अधिकार आयुक्तांना आहेत. आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी असल्याने शासनाच्या आदेशानुसार त्यांना काम करणे बंधनकारक आहे. शासनाच्या आदेशानुसार आयुक्तांमार्फत एलबीटी लागू करण्याची कारवाई सुरू आहे. 

महापालिकेचा फायदा 
एलबीटी लागू झाल्यास महापालिकेचा फायदा आहे. सध्या महापालिकेच्या 18 जकात नाक्‍यांवर एकूण 350 कर्मचारी कार्यरत आहे. एलबीटीनंतर सुमारे शंभर कर्मचारी एलबीटी वसुलीचे काम पाहतील, तर उर्वरित कर्मचारी पालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये सामावून घेतले जातील. त्यामुळे पालिकेला नव्याने कर्मचारी भरती करण्याची आवश्‍यकता भासणार नाही. याशिवाय जकात नाक्‍यांचे वीज व पाणीबिलाची बचत होईल. भरारी पथकावरचा खर्च कमी होईल. याशिवाय पैसे भरणा करणारे अधिकृत दलाल कमी होणार आहेत. एलबीटीचे उत्पन्न थेट पालिकेच्या तिजोरीत जमा होणार असल्याने महापालिकेला शासनावर अवलंबून राहता येणार नाही. 

महापालिकेचा तोटा 
एलबीटी करप्रणालीत व्यापाऱ्यांना कर भरण्यासाठी 40 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे एलबीटी लागू झाल्यानंतर सुरवातीचे दीड महिना पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन लांबण्याची शक्‍यता आहे, तर महसुली खर्चावर मर्यादा आणावी लागणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात महापालिकेने 850 कोटी रुपये जकातीतून उत्पन्न ग्राह्य धरले आहे. व्यापाऱ्यांचे आंदोलन, अपेक्षित प्रमाणात एलबीटी अदा केला जाईलच याची शाश्‍वती देता येत नसल्याने उद्दिष्टापेक्षा कमी जकात मिळण्याची शक्‍यता आहे, असे झाल्यास पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची शक्‍यता आहे. एलबीटी कमी प्राप्त झाल्यास त्याची भरपाई अनुदान स्वरूपात शासन देणार आहे. मात्र, यापूर्वी शासनाकडून घोषित करण्यात आलेले अनुदान वेळेत न मिळाल्याने शासनाच्या अनुदानाच्या आश्‍वासनाबाबत शाश्‍वती देता येत नाही. 

उद्योजकांचा पाठिंबा का? 
एलबीटीला उद्योजक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर ही उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणारी मोठी संघटना आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या 40 वर्षांपासून जकात कर रद्द करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. जकात कर रद्द करून त्याऐवजी व्हॅट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु शासनाने व्हॅट करही सुरू ठेवला व जकातही त्यामुळे उद्योजकांनी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा करून जकात रद्द करण्याची मागणी केली होती. शासनाने जकात रद्द करण्यास मान्यता दिली; परंतु त्याऐवजी एलबीटी लागू केला जाईल अशी नवी भूमिका घेतल्याने उद्योजकांनी जकातीला पर्याय म्हणून एलबीटी करप्रणालीचा स्वीकार केला आहे. जकात नाक्‍यांवर वाहने अनेक तास खोळंबतात. वाहनांच्या रांगाच्या रांगा लागत असल्याने यातून आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय पर्यावरणाचाही ऱ्हास होत असल्याने उद्योजकांनी जकात नाक्‍यावरील त्रास कमी होईल म्हणून एलबीटीला पाठिंबा दिला आहे. 

व्यापाऱ्यांचा विरोध का? 
- व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना नवीन नोंदणी दाखला घ्यावा लागणार आहे. 
- वर्षभरात आणलेल्या मालाची किंमत पाच हजार व ज्याची एकूण खरेदी अथवा विक्री एक लाख रुपये असेल त्या व्यापाऱ्यांना नोंदणी बंधनकारक आहे. 
- वार्षिक उलाढाल दीड लाख रुपये असणाऱ्या व्यावसायिकांनाही नोंदणी करावी लागणार आहे. यानुसार पानटपरी, चहाची गाडी, भेळवाले, वडापाववाले हे लहान व्यापारी एलबीटीच्या कवेत येणार आहेत. 
- कर आकारली जाणारी वस्तू शहरातूनच आणली आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांवर राहणार आहे. 
- वाहन, मशिन दुरुस्तीसाठी आलेल्या वस्तू शहराबाहेरून आल्या असतील तर त्यांची सविस्तर नोंद ठेवावी लागणार आहे. 
- लहान, मध्यम अशा सर्वच व्यापाऱ्यांना दरमहा कर भरणे, विवरणपत्र भरणे, करनिर्धारणा करावी लागेल. 
- कर न भरल्यास पहिल्या वर्षी दरमहा दोन टक्के व त्यानंतर दरमहा तीन टक्के व्याजाची तरतूद आहे. 
- दहा रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या वस्तूचे बिल करून त्यावर ग्राहकाचे नाव, पत्ता, एलबीटी क्रमांक लिहून ती बिले दहा वर्षांपर्यंत सांभाळणे. 
- ग्राहकांकडून खरेदी केलेल्या वस्तूंची पावती करणे व प्रत्येक व्यवहाराची नमुन्यात नोंद ठेवणे. 
- एलबीटी लागू नसला तरी दर सहा महिन्याला शून्य रकमेचे रिटर्न व्यापाऱ्याला भरावे लागणार आहे. 
- रिटर्न वेळेत न भरल्यास व्यावसायिकास पाच हजार रुपयांचा दंड व दोन वर्षे कारावासाची तरतूद कायद्यात आहे. 
- शहराबाहेरून ग्राहक पालिका हद्दीत आल्यास व त्याची वस्तू व्यावसायिकास विकल्यास त्या मालाच्या रकमेवर एलबीटी भरण्याचे बंधन आहे. 
- ज्या मालावर "व्हॅट' नाही व ज्यांना "व्हॅट'मध्ये नोंद करण्याची सूट आहे अशा व्यावसायिकांना एलबीटी कायद्याखाली नोंदणी करणे सक्तीचे आहे. 
- व्हॅट, एक्‍साईज ड्यूटी, सर्व्हिस टॅक्‍स, वाहतूक भाडे यावर कर आकारला जाणार आहे. 
- व्यावसायिकाने एलबीटीची रक्कम वेळेत न भरल्यास महापालिका त्याच्याकडून 36 टक्के दराने त्यावर व्याज वसूल करणार आहे. 
- सध्या व्यावसायिकांना नऊ प्रकारचे "टॅक्‍स रिटर्न' भरावे लागतात. आता एलबीटी हा नव्याने आलेला दहावा कर असल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे. 

एलबीटीतून वगळलेल्या वस्तू 
अन्नधान्य व अन्नपदार्थ, पेये, औषधे, सौंदर्यप्रसाधने, बी-बियाणे, खते, रसायने, शेतीची अवजारे, भाज्या, फळे, जनावरे, पक्षी, अंडी, मासळी, दूध, पाव, मिनरल वॉटर, मीठ, मिलिटरी कॅंटीनमधील वस्तू, प्राण्यांचे खाद्य, अपंगांचे साहित्य, कापूस, ताग, रेशीम, चामडे व त्यापासून बनविलेल्या वस्तू, कागद व प्लास्टिकच्या वस्तू, धातू व त्यापासून बनविलेल्या वस्तू, खनिज तेले आदी. 

एलबीटीचे स्वरूप 
सर्व महापालिका क्षेत्रांतील एलबीटीचे दर साधारणतः समान असतील. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंना या करातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर एक लाखापर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांची करातून सुटका करण्यात आली असून, दहा लाखांपर्यंतच्या उलाढालीवर एकरकमी कर भरण्याची सूट देण्यात आली आहे. ती अशी ः 

अ.क्र. वर्षभरातील उलाढाल एकरकमी भरावयाचा एलबीटी (रुपयांमध्ये) 
------------------------------------------------------------- 
1. एक लाख 0000 
2. एक ते दोन लाख चार हजार 
3. दोन ते तीन लाख सहा हजार 
4. तीन ते चीर लाख आठ हजार 
5. चार ते पाच लाख दहा हजार 
6. पाच ते सहा लाख 12 हजार 
7. सहा ते सात लाख 14 हजार 
8. सात ते आठ लाख 16 हजार 
9. आठ ते नऊ लाख 18 हजार 
10. नऊ ते दहा लाख 20 हजार 
11. दहा लाखांच्या वर वस्तुनिहाय ठरलेला कर 

अन्य वस्तूंवरील अंदाजे कराची टक्‍केवारी ः 
- विदेशी फर्निचर, तंबाखू व तत्सम पदार्थ, मद्य व मद्यार्क, 1001 सीसीपेक्षा जास्त अश्‍वशक्‍तीची वाहने - (सहा टक्के) 
- अवजड वाहने - (पाच टक्के) 
- लाकूड व त्यापासून बनविलेल्या वस्तू, इमारत व बांधकाम साहित्य, हत्यारे व दारूगोळा, छायाचित्रण व सिनेमासाठी लागणारे साहित्य, इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक वस्तू ,चारचाकी लहान वाहने, यंत्रसामग्री, लक्‍झरी वस्तू, शीतपेये, सुकामेवा- ड्रायफ्रूट - (चार टक्के) 
- आयात सौंदर्यप्रसाधने, डिटर्जंट व साबण, दोन व तीनचाकी वाहने - (तीन टक्के) 
- सायकल, कटलरी, क्रोकरी वस्तू, ताडी, नीरा, मिठाई, खाद्य व अखाद्य तेले, तेलबिया, मसाल्याचे पदार्थ, किराणा सामान, प्रक्रिया कलेले खाद्यपदार्थ - (दोन टक्के) 
- डिझेल वर - ( तीन ते चार टक्‍के) 
(व्यापाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनस्तरावर जकातीला जे दर लागू होते त्याचप्रमाणे एलबीटी आकारण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यामुळे एलबीटीचे दर राज्यात सर्वत्र बदलण्याची शक्‍यता आहे.) 




    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in

हरिहरन यांना "लता मंगेशकर पुरस्कार'-2013


  • मध्यप्रदेश राज्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो.
  • प्रसिद्ध पार्श्‍वगायक हरिहरन यांना राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मिळणारे हरिहरन हे 28 वे व्यक्ती आहेत. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • 58 वर्षीय हरिहरन यांनी आत्तापर्यंत मराठीसहित अनेक भारतीय भाषांमध्ये पार्श्‍वगायन केले आहे. अजय अतुल यांनी संगीत दिलेल्या जोगवा चित्रपटामधील "जीव रंगला' हे हरिहरन यांचे गाणे विशेष गाजले होते.

Verghese Kurien


  • best known as the "Father of the White Revolution" and Milkman of India" for his 'billion-litre idea' (Operation Flood) — the world's biggest agricultural development programme
  • He founded around 30 institutions of excellence (like AMUL, GCMMF, IRMA, NDDB) which are owned, managed by farmers and run by professionals. 
  • the founding chairman of the Gujarat Co-operative Milk Marketing Federation (GCMMF), Kurien was responsible for the creation and success of the Amul brand of dairy products.

YearName of Award or HonorAwarding Organization
1999Padma VibhushanGovernment of India
1993International Person of the Year AwardWorld Dairy Expo
1989World Food PrizeWorld Food Prize, USA.
1986Wateler Peace Prize AwardCarnegie Foundation, The Netherlands.
1986Krushi Ratna AwardGovernment of India.
1966Padma BhushanGovernment of India.
1965Padma ShriGovernment of India.
1963Ramon Magsaysay AwardRamon Magsaysay Award Foundation.

National child policy 2012



  • India, on 18 April 2013, adopted a policy document at the highest level to recognize every child’s right to survival, development, protection and participation.
  • Policy defined a child as a person below 18 years of age. 
  • It adds that all existing legislation will have to change to honor the policy.
  • This means the government will now have to amend laws that bear conflicting definitions of children.
  • The key guiding principles of the policy are the right of every child to life, survival, development, education, protection and participation, equal rights for all children without discrimination. 
  • The Prohibition of Child Marriage Act 2006 will have to be amended to define all children below 18 years.
  • At present, this law differentiates between male and female children defining a child as anyone below 21 years in case of “males” and “anyone below 18 years in case of “females”.
  • Similarly, the Prohibition of Child Labour Act will have to change as it currently defines a child as someone below 14 years for the purpose of child labour.
  • The change in child’s definition stems from India’s commitment to the UN Convention on Rights of the Child which it ratified long ago but failed to bring its laws in line with the UNCRC. 
  • India adopted the last National Child Policy way back in 1974.
  • The old policy stressed Integrated Child Development Services, immunisation and child labour. But since the advent of globalisation, rise in crimes against children and strides in mass media, the government had not revised its policy which could guide the national plans properly.


    To read more about current affairs for the preparation of MPSC and UPSC exam please visit:www.mpscmatter.blogspot.in


India joins Madrid Protocol


  • The Madrid System for the International Registration of Marks offers trademark owners a cost effective, user friendly and streamlined means of protecting and managing their trademark portfolio internationally.
  • Under the WIPO-administered Madrid system, a trademark owner may protect a mark in up to 88 countries plus the European Union by filing one application, in one language (English, French or Spanish), with one set of fees, in one currency (Swiss Francs).
  • to know about WIPO click here
  • Trademarks are a key component of any successful business marketing strategy as they allow companies to identify, promote and license their goods or services in the marketplace and to distinguish them from those of their competitors, and cement customer loyalty.
  • A trademark symbolizes the promise of a quality product and in today’s global and increasingly electronic marketplace, a trademark is often the only way for customers to identify a company’s products and services.
  • The international trademark system is governed by two treaties, namely, 
  1. the Madrid Agreement Concerning the International Registration of Marks (1891) and 
  2. the Madrid Protocol Relating to the Madrid Agreement Concerning the International Registration of Marks (1989).
  • On 8 April 2013, India joined the Madrid Protocol which will enable domestic companies and entrepreneurs to obtain cost effective global trademark registration.
  • The treaty will enter into force with respect to India on 8 July 2013, according to the statement by the World Intellectual Property Organization (WIPO).
  • India is the 14th of the G-20 economies to accede to the Madrid Protocol.
  • recently joined countries are Colombia, Mexico, New Zealand and Philippines.

World Intellectual Property Organization (WIPO)


  • The World Intellectual Property Organization (WIPO) was established in 1970,The Organization became a specialized agency of the United Nations in 1974.
  • Headquarter: Geneva in Switzerland.
  • The Director General is Francis Gurry.
  • WIPO counts 184 Member States – more than 90 percent of the world’s countries.
  • WIPO is dedicated to developing a balanced and accessible international intellectual property (IP) system, which rewards creativity, stimulates innovation and contributes to economic development while safeguarding the public interest.

What is intellectual property?
  • Intellectual property refers to creations of the mind.
  • It is divided into two categories:

  1. Industrial property includes patents for inventions, trademarks, industrial designs, integrated circuits and geographical indications.
  2. Copyright and related rights cover literary and artistic expressions (e.g. novels, poems, plays, films, music, artistic works and architecture), and the rights of performing artists in their performances, producers of phonograms in their recordings, and broadcasters in their radio and television broadcasts.
intellectual property rights
  • Intellectual property rights allow the creators – or owners of patents, trademarks or copyrighted works – to benefit from their own work or investment in a creation.
  • These rights are outlined in Article 27 of the Universal Declaration of Human Rights, which provides for the right to benefit from the protection of moral and material interests resulting from authorship of any scientific, literary or artistic work.

Thursday 16 May 2013

ILMENITE


  • It is crystalline iron titanium oxide (FeTiO3).
  • It is weakly magnetic, trigonal crystal
  • Found in TN, Odisha, Kerala.
  • It is used in paint and coating industry.
  • Titanium is used in aircraft, tank, weapons, artificial joints, sporting equipment and high performance alloys.
  • Australia is largest producer in the world.

Why In the news?
  • In India's budget 2013-14 India impose a duty of 10 percent on export of unprocessed ilmenite.
  • Prices of unprocessed ilmenite have gone up several fold in the export market.

Nitaqat


  • Nitaqat the New Localization System for Jobs in the Kingdom of Saudi Arabia
  • In order to reduce the unemployment rate among the Saudi citizens, the Saudi government issued a new system for the localization of jobs in Saudi Arabia under the name of “Nitaqat”.
  • The new system replaces the system applied since 1994 under the name of “The Saudization”. 
  • Nitaqat adopts several principles, which will have impacts on non-Saudis working in the Kingdom.
  • The economy in Saudi Arabia – as it is the case in other states of the Gulf Cooperation Council (GCC) – depends largely on the existence of a large proportion of expatriates working for various establishments in the private and public sector.
  • However, unlike the other states of the GCC, Saudi Arabia has large number of unemployed citizens which creates a state of resentment among those citizens.
  • The basic principal of the system was the requirement to appoint certain percentage of the total workforce of all the establishments existing in the Kingdom from the Saudi citizens. 
  • However, due to several reasons, the system did not achieve the desired objectives
  • Therefore, the Saudi government has endeavoured to find other solutions to eliminate the phenomenon of unemployment among Saudi nationals.
  • The efforts of the government resulted in the implementation of several strategies. The most important of these strategies was the issuance of a new system under the name “Nitaqat” for localizing the jobs in the Kingdom to replace the system of Saudization.
  • The name Nitaqat means Ranges in Arabic.
  • Nitaqat divides the labour market into 41 activities and each activity into 5 sizes (Giant, Large, Medium, Small and Very Small) to have in total 205 categories. 
  • The performance of the establishment in the localization of the jobs is to be evaluated compared with the similar establishment’s activity and size in order to have fair standard for the evaluation
  • After the evaluation, Nitaqat classifies these establishments into ranges (Excellent, Green, Yellow and Red) based on the ratio of the citizens working in the establishment.
  • The Excellent and Green range, which are the ranges with the highest localization ratios, will be rewarded, while the system deals firmly with the Red range, which is the range with the lowest localization ratio and gives more time for the Yellow range to adjust their positions, being the medium range.
  • The motive of applying the Nitaqat system is to make the appointment of Saudi citizens represent a competitive advantage for the establishments in the Kingdom.
IMPACT ON INDIA
  • The 'Nitaqat' law makes it mandatory for local companies to hire one Saudi national for every 10 migrant workers. 
  • There has been widespread perception that the new policy will lead to denial of job opportunities for a large number of Indians working there.
  • Over two million Indians are currently working in Saudi Arabia. The Saudi government was implementing the Nitaqat law to cut unemployment in the country.
  • About 18,000 Indian workers in Saudi Arabia, who had applied for emergency exit papers amid concerns about possible job losses after a new labour law, have got their travel documents processed.

Wednesday 15 May 2013

The Criminal Law (Amendment) Bill 2013


  • The Criminal Law (Amendment) Bill 2013 was passed in the Lok Sabha on 19 March 2013.
  • The punishments range from life term to death penalty for the repeated offenders. 
  • The Bill brought out after the Delhi gangrape of the Para-medical student on 16 December 2012.
  • fixed the age of consensual sex to 18 years. 
Key features of the Criminal Law (Amendment) Bill 2013
  • The Criminal Law (Amendment) Bill 2013 was actually the Ordinance that was promulgated by the President of India on 3 February 2013. 
  • The bill seeks to make amendments in the Code of Criminal Procedure, Indian Penal Code, Protection of Children from Sexual Offences Act as well as Indian Evidence Act.
  • The bill states that offender could be given an imprisonment of not less than 20 years, extendable up to life term. 
  • The bill also includes provisions for death sentence for offenders who are convicted earlier for such crimes. 
  • This is for the first time that the bill described voyeurism and stalking as the non-bailable offences, in case repeated for the second time. 
  • Perpetrators of acid attacks would be sentenced for 10-year jail term. 
The Criminal Law (Amendment) Bill 2013 incorporated new offences in the Indian Penal Code (IPC) which are as follows:
  1. Acid Attack
  2. Attempt to Acid Attack
  3. Sexual Harassment
  4. Public disrobing of woman
  5. Voyeurism
  6. Stalking

National Food Security Bill, 2011

  • 18/12/2011, the Cabinet cleared the National Food Security Bill, 2011.
  • Draft will be presented for approval of the parliament in next session.
  • People living below poverty line (BPL) has been termed as Priority Group(PG)/Priority Household(PH)PG/PH to be allotted 7 kg grain/month/person or 35kg grain/month/family, provided with Rice @ Rs. 3/kg, Wheat @ Rs.2/kg, Millets @ Rs.1/kg.
  • The remaining of the targeted population (above poverty line) has been termed as General Group (GG): GG to be allotted @ 3kg/person/month at half of minimum support price given to farmers.
  • Mid-day meal scheme and ICDS has been brought under the Bill.
  • The target population is LEGALLY ENTITLED to cheap grain and millet.
  • 63.5% of the total population will be covered as per the Bill out of whom 75% will be from rural area and 50% from urban area.
  • 46% of the PG/PH in rural areas will be covered as proposed in the Bill, whereas for urban areas the same will be 28%.
  • Lactating mothers will be given Rs. 1000 a month for 6 months and also nutritional support.
  • Children up to the age of 14 years will get nutritional support.
  • Persons residing in disaster-affected areas will get 2 free meals/day up to 3 months; non-compliance will attract penalty of Rs.5000 for the responsible public servant.
  • The implementation of proposals contained in the said Bill will burden the Exchequer with an extra Rs. 27,973 crore a year.
  • Annual food subsidy bill will go up from Rs. 67,000 crore to Rs. 94,973 Crore.
  • Grain requirement will be 62 million tones.

भारतीयांसाठी ब्रिटनचा 'सुपर प्रायोरिटी' व्हिसा

  • भारतातून इंग्लंडमध्ये तातडीने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ब्रिटनने त्याच दिवशी महाप्राधान्याने व्हिसा सेवा देण्याचे ठरविले आहे.
  • अशा प्रकारची सेवा ब्रिटनने जगातील कोणत्याही देशासाठी सुरू केलेली नाही.
  • ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे भारतभेटीवर आले असताना त्यांनी महाप्राधान्याने व्हिसा देण्याची घोषणा केली होती.
  • भारतात या सेवेला 14 January,2013 पासून सुरुवात करण्यात आली आहे.

Tuesday 14 May 2013

सीबीआय मुक्त करण्याचे विधेयक


  • केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) बाह्य हस्तक्षेपांपासून मुक्त करण्याचे विधेयक तयार करण्यासाठी केंद्र सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली.
  • केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम हे या मंत्रिगटाचे अध्यक्ष असतील. 
  • या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद, माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल, माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचा समावेश आहे.
  • सीबीआयला बाह्य हस्तक्षेपांपासून मुक्त करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आणि त्या स्वरुपाचा कायदा करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला होता.
  • त्या पार्श्वभूमीवर सरकारने या मंत्रिगटाची स्थापना केली आहे.

Monday 13 May 2013

प्राचीन भारताचा इतिहास part 1

प्राचीन इतिहासाची साधने
प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी पुढील साधनांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो.
आलेख - शिलालेख, स्तंभलेख, गुहालेख, ताम्रपट यावरून आपल्याला प्राचीन इतिहासाची ओळख होते. जर हे आलेख सापडले नसते तर अनेक राज्यांच्या इतिहासापासून आपण अज्ञात राहिलो असतो. उदा. ओरिसामधील हातीगुंफा या ठिकाणी जो गृहालेख सापडला आहे, त्यावरून आपणास कलींग सम्राट खारवेल यांची माहिती उपलब्ध होते. अशोकाच्या अनेक शिलालेखांवरून त्या काळच्या राज्यकारभाराचीही माहिती मिळते.
नाणी - प्राचीन काळातील जी नाणी सापडली आहेत. त्यांच्यावर जी अक्षरे कोरली आहेत, त्यावरून आपणास प्राचीन इतिहासाची माहिती मिळते. उदा. समुद्रगुप्त राज्याच्या नाण्यावर अश्वमेधाचे चित्र असून या राजाने पृथ्वीचे पालन करून स्वर्ग जिंकल्याचे वाक्य या नाण्यावर कोरले आहे. याचा अर्थ या राज्याच्या ताब्यात फार मोठा प्रदेश असू शकतो.
वाङ्मयीन साधने - यात धर्मग्रंथ, इतर वाङ्मय तसेच परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते यांवरून आपल्याला बरीच माहिती मिळते.
प्रागतिहासिक कालखंड - हा कालखंड खूप मोठा होता. हा मानवी इतिहासाचा सुरूवातीचा कालखंड आहे. या कालखंडाला 'अश्मयुग' असेही संबोधले जाते. या कालखंडात मानवाला लेखन कला अवगत नव्हती. या कालखंडाचे तीन भाग पडतात - पुराश्मयुग (Palaeolithic age ), मध्याश्मयुग (Mesolithic age), नवाश्मयुग ( Neothilic age)
१. पुराश्मयुग (Palaeolithic age ) - या कालखंडात मानवाने प्रामुख्याने दगडी हत्यारांचा वापर केला. या हत्यारांचा वापर प्रामुख्याने कंदमुळ काढणे, मांसाचे तुकडे काढणे यासाठी केला असावा. या काळातील मानवाने दगडांवर तसेच गुहांमध्ये काही चित्रे काढली आहेत. यावरून त्या काळातील सामाजिक जीवनासंदर्भात माहिती मिळते.
२. मध्याश्मयुग (Mesolithic age ) - पुराश्मयुग व नवाश्मयुग यांना जोडणारा हा कालखंड आहे. या काळात मानव शिकार करून अन्न मिळवत असे. या काळात मानवाने टोकदार हत्यारांचा वापर शिकारीसाठी सुरू केला. भीमबेटका, आदमगड, प्रतापगड याठिकाणी मध्याश्मकालीन चित्रकला सापडली आहे.
3) नवाश्मयुग ( Neothilic age) - या काळात मानवाने शेती करायला सुरूवात केली. या काळातील मानव चिखलाने बांधलेल्या आयताकृती किंवा वर्तृळाकृती घरात राहत असे. या काळात धान्य साठवणुकीसाठी व अन्न तयार करण्यासाठी भांडय़ांचा वापर केला गेला. या काळात मानवाने चाकाचा शोध लावला. थोडक्यात शिकारी अवस्थेतून माणूस या युगात शेतकरी अवस्थेत आला.
हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृती ही सर्वात प्राचीन व विकसित संस्कृती होती. ही संस्कृती कांस्ययुगीन संस्कृती होती, या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखले जाते. सिंधू संस्कृतीच्या कार्यकालाबाबत इतिहासकारांमध्ये एक मत नाही. मात्र, साधारणत: इ.स. पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व २६०० हा कालखंड प्रारंभिक हडप्पा संस्कृतीचा तसेच इ.स. पूर्व २६०० ते २८०० हा कालखंड परिक्पव हडप्पा संस्कृतीचा सांगता येईल. या संस्कृतीचा विस्तार उत्तरेकडील- मांडा (जम्मू काश्मीर) पासून दक्षिणेकडील दायमाबाद (महाराष्ट्र) तर पश्चिमेला सुतकागेंडोरपासून पूर्वकडील उत्तर प्रदेशातील आलमगीपर्यंत झालेला आढळतो.
वैशिष्टय़े :- ही कांस्ययुगीन संस्कृती होती. यात योजनाबद्ध नगररचना व पक्क्य़ा इमारती होत्या. सांडपाण्याचे उत्तम व्यवस्थापन होते. लिपीचे ज्ञान होते. भुयारी गटारी झाकण्यासाठी दगड व पक्या विटांचा वापर केला जात असे. जवळपास सर्व हडप्पा संस्कृतीतील शहरांतील घरात स्वत:चे अंगण व स्नानगृह होते. पुष्कळ घरात स्वत:च्या विहिरी होत्या. स्त्री-पुरुष सौंदर्यप्रसाधनांचा वापर करीत असत. पुरुष दाढी करून मधोमध भांग पाडत. उत्खननात स्त्रियांच्या टेराकोटा मूर्ती सापडल्या आहेत. उत्खननात आरसे व कंगवेदेखील सापडले आहेत. येथे सापडलेल्या एका मूर्तीमध्ये झाडांचा उगम स्त्रीच्या गर्भातून झालेला आहे, असे दाखवण्यात आले आहे. यावरून हे लोक भूमीला मातृदेवता मानत असत. हडप्पाकालीन लोक मर्तिपूजक होते. मात्र, हडप्पा लोकांच्या धर्म संकल्पना कोणत्या स्वरूपाच्या आहेत, हे मात्र त्यांच्या लिपीचे पुरेसे ज्ञान न झाल्याने आपण सांगू शकत नाही.
हडप्पाकालीन लिपी :- या लिपीचे अद्याप पुरेसे आकलन झालेले नाही. ही लिपी चित्रात्मक स्वरूपाची होती.
वजन आणि मापे :- उत्खननात जे वजन व मापे आढळली आहेत, त्यावरून व्यापारासंबंधी कल्पना येते. येथे व्यापार दोन प्रकारे चालत असावा- एक म्हणजे अंतर्गत व दुसरा म्हणजे बहिर्गत.
कृषी जीवन :- शेती हा व्यवसाय हडप्पा संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. हडप्पा संस्कृतीतील लोक लाकडी नांगरांचा वापर करीत असत. पण नांगरांचे ओढणे बलामार्फत किंवा माणसामार्फत होत असेल, याचे आकलन होत नाही. येथील लोक गहू, बार्ली, वाटाणा, तीळ, मोहरी या पिकांचे उत्पादन घेत असत. हे धान्य मोहोंजोदरो, हडप्पा तसेच कालीबंगन येथील धान्य कोठारात साठवले जात असावे. उत्खननात सापडलेल्या अनेक मृदांवर प्राण्यांचे चित्र आहे. गाय, म्हैस, हत्ती, डुक्कर, मांजर, कुत्रा, ससा, माकड, हरीण, मोरांचे पालन हे लोक करीत असत. हत्ती व गेंडा या प्राण्यांची माहिती हडप्पा लोकांना होती. मात्र सिंह या प्राण्याची ओळख हडप्पावासीयांना नव्हती. हडप्पा संस्कृतीचा अंत कसा झाला, याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.
सिंधू संस्कृतीतील महत्त्वाची ठिकाणे :-
१) हडप्पा :- रावी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर पाकिस्तानातील पूर्व पंजाबमधील मॉण्टगोमरी जिल्ह्य़ात आहे. याचा शोध १९२१ मध्ये दयाराम साहनी यांनी लावला. येथे धान्याचे कोठार सापडले आहे. तसेच दफनभूमी, दगडाची मानवी नृत्य करणारी मानवी मूर्ती सापडली आहे. येथे मानवी सांगाडे सापडले आहेत.
२) मोहोंजोदरो :- याचा अर्थ 'मृताची टेकडी' असा होतो. याचा शोध १९२२ मध्ये आर. डी. बॅनर्जी यांनी लावला. हे ठिकाण सिंधू नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हे सर्वात मोठे नगर असावे. शहराचा आकार आयताकृती होता. कांस्य समिश्राचे नर्तिकेची मूर्ती येथे सापडलेली आहे. दाढी असलेली दगडी मूर्ती देखील सापडली आहे. भांडय़ात कपडय़ाचा तुकडा सापडलेला आहे. भांडय़ाच्या तुकडय़ावर जहाजाचे चित्र आढळून आले आहे.
3) चन्होदारो :- ( chanhudaro) :- पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंध नदीवर वसलेले होते. याचा शोध एम. जी. मुजुमदार यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील एकमेव ठिकाण जेथे Citadel ( किल्ला ) आढळलेला आहे. येथे बांधकामाचे दगड मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. हे मनी तयार करण्याचे प्रसिद्ध ठिकाण असावे.
४) कालिबंगन ( kalibangan) :- राजस्थानातील घग्गर नदीवर वसलेले ठिकाण. याचा शोध ए. घोष यांनी लावला. कालिबंगन म्हणजे काळ्या बांगडय़ा येथे उंटाचे हाड सापडले आहे. येथे पूर्व हडप्पा व परिपक्व हडप्पा अशा दोन्ही अवस्था आढळून आल्या आहेत.
५) लोथल :- गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ातील भोगावा नदीतीरावरील वसलेले ठिकाण. याचा शोध एस. आर. राव यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर होय. येथे कृत्रिम जहाज बोट सापडली आहे. येथील मुद्रांवर जहाजाची चित्रे आहेत.
६) बनवाली :- याचा शोध आर. एस. बिस्त यांनी लावला. हरियाणातील हिस्सार जिल्ह्य़ातील हे ठिकाण. येथे यव ( बार्ली) हे धान्य सापडलेले आहे.
७) धोलवीरा :- गुजरातमधील हे ठिकाण. याचा शोध डॉ. जे. पी. जोशी व आर. एस. बिस्त यांनी लावला.
८) राखीगड :- घग्गर नदीवरील हरियाणातील हे शहर धोलवीरापेक्षाही मोठे होते.
९) रोपार :- पंजाबमधील सतलज नदीवरील ठिकाण. याचा शोध यज्ञदत्त शर्मा यांनी लावला.
मृतांसोबत कुत्रा पुरल्याचे अवशेष येथे सापडलेले आहेत.
१०) सुरकोटाडा :- गुजरातमधील कच्छ जिल्ह्य़ातील हे ठिकाण. याचा शोध जगपती जोशी यांनी लावला.
११) कोटदिजी :-पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंधू नदीवरील हे ठिकाण. येथे परिपक्व हडप्पा संस्कृती असावी. येथे चाकावरील मृद भांडी व तीही रंगवलेली आढळून आलेली आहे.
१२) सुतकागेंडोर :-पाकिस्तानातील बलुचिस्तानातील ठिकाण. याचा शोध औरेल स्टेईन याने लावला.
वैदिक संस्कृती
वैदिक संस्कृतीचे दोन कालखंडात विभाजन करतात.
१) ऋग्वेदी कालखंड - ( इ. स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व १०००) ऋग्वेदी कालखंड हा आर्याचा भारतातील प्रारंभिक कालखंड आहे.
२) उत्तर वैदिक कालखंड - ( इ. स. पूर्व १००० ते इ. स.पूर्व. ५००) आर्याच्या भटकंती जीवनास स्थिरता प्राप्त झाली. शेतीचा हळूहळू विस्तार.
ऋग्वेदी कालखंड - या काळात वेदांची निर्मिती झाली म्हणून आर्याच्या या संस्कृतीला वैदिक संस्कृती म्हणतात. वेद हा शब्द संस्कृत भाषेतील असून तो विद या धातूपासून बनलेला आहे. विद म्हणजे ज्ञान होणे. हिंदू लोकांची अशी श्रद्धा आहे की, वेद हे अपौरुषेय आहेत ते कोणत्याही मानवाच्या हातून लिहिले गेलेले नाहीत. त्यांची रचना परमेश्वराने केली आहे. ऋग्वेद हा आर्याचा पहिला ग्रंथ होता. आर्याच्या साहित्यनिर्मितीवरून आर्याच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाचा आढावा घेता येतो.
धार्मिक जीवन
ऋग्वेदातील सर्वात महत्त्वाची देवता इंद्र. याला पुरंदर या नावाने ओळखले जायचे. त्याचा अर्थ दुर्ग नष्ट करणारा.
१) इंद्र :- ऋग्वेदात २५० ऋचा इंद्राला अर्पन केल्या आहेत. पर्जन्याची देवता, दुर्ग नष्ट करणारी देवता, राक्षसांविरुद्ध लढणारा व आर्याना विजयी करणारी देवता.
२) अग्नी :- ऋग्वेदातील २०० ऋचा अग्नीला अर्पण केलेल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाची देवता देव आणि सामान्य लोकांतील दुवा म्हणून भूमिका.
३) वरूण :- ऋग्वेदातील २०० ऋचा वरूणाला अर्पण तिसरी महत्त्वाची देवता, नसर्गिक देवता नसर्गिक व्यवस्थेचा आधार मानला जात असे.
४) सोम :- वनस्पतींची देवता.
५) मरूत :- वायुदेवता.
६) आदिती उषस :- स्त्री देवता ( ऋग्वेदात उल्लेख)
वैदिक वाङ्मय :- वेद हा शब्द संस्कृत भाषेतील असून तो विद या धातूपासून बनलेला आहे. विद म्हणजे ज्ञान होणे. हिंदू लोकांची अशी श्रध्दा आहे की वेद हे अपौरुषेय आहेत. ते कोणत्याही मानवाच्या हातून लिहिले गेलेले नसून त्यांची रचना परमेश्वराने केली आहे. पूर्वी लिखाणाची कला मानवाला अवगत नव्हती. वैदिक वाङ्मयात चार प्रकारच्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो- संहिता, ब्राह्मण्ये, आरण्यके, उपनिषदे
संहिता - सर्व संहितांमध्ये ऋग्वेद हा आद्यवेद मानला जातो.
ऋग्वेद - तो सर्वात प्राचीन वेद आहे. ऋग्वेदात दहा मंडले असून १०२८ सूक्ते आहेत. ही सूक्ते भिन्नसमयी भिन्न ऋषींनी रचिली आहेत. यापकी दोन ते सात मंडले ही प्राचीनतम आहेत. तिसऱ्या मंडलात गायत्री मंत्र सांगितलेला आहे. सातव्या मंडलात दशराजजन्य युद्धाचा उल्लेख आहे. नवव्या मंडलात सोमाचे वर्णन केले आहे. पहिले आणि दहावे मंडल हे अर्वाचीन मानले जाते. ऋग्वेदातील सूक्ते फक्त पुरुषांनीच लिहिली नाहीत, तर यात स्त्रियांचाही मोठा वाटा होता. ऋग्वेदातील देवता म्हणजे निसर्गाने धारण केलेली विविध रूपे होत.
सामवेद - सामन म्हणजे स्वर किंवा छंद, म्हणून सामदेवाला स्वरशास्त्र म्हणतात. भारतीय संगीताचा उगम आपणास सामवेदात आढळतो. सामवेदात १५४९ किंवा १८१० ऋचा आहेत. परंतु, यापकी केवळ ७५ ऋचाच स्वतंत्र किंवा नवीन रचिल्या आहेत. बाकीच्या सर्व ऋचा ऋग्वेदातून घेतल्या आहेत. गाण्याचे राग शिकवणे हा सामवेदाचा प्रमुख हेतू होता. सामवेदापासून आपल्याला भारतीय संगीतशास्त्राचा इतिहास माहीत होतो.
यजुर्वेद - यजूस याचा अर्थ मंत्र किंवा सूक्त. यज्ञविधीवेळी म्हणावयाचे मंत्र या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. आर्य जेव्हा गंगा-यमुनेच्या खोऱ्यात स्थायिक झाले तेव्हा त्यांच्या नित्य जीवनात यज्ञयाग, गृहकृत्ये यांना महत्त्व प्राप्त झाले. यज्ञ कसे करावे, कोणत्या वेळी करावे, यज्ञाच्या वेळी कोणते मंत्र म्हणावे इत्यादी सर्व माहिती आहे. म्हणून या वेदाला यज्ञवेद असेही म्हणतात. या वेदाचे शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद असे दोन प्रकार आहेत. साहित्यिक दृष्टीने विचार केला तर यजुर्वेद हा रुक्ष व नीरस वाटतो. कारण यात कर्मकांडाचेच वर्णन आहे. परंतु या वेदातून आपणास आर्याची यज्ञसंस्था कशी विकसित होत गेली याचे ज्ञान मिळते.
अथर्ववेद - अथर्वन लोकांचा वेद म्हणून यास अथर्ववेद म्हणतात. पूर्वीच्या काळी अग्नीची उपासना करणाऱ्या पुरोहितांना अथर्वन म्हणत. या वेदांपकी एकतृतीयांश भाग ऋग्वेदातून जसाचा तसा घेतला आहे. अथर्ववेद हा पहिल्या तीन वेदांपेक्षा भिन्न वाटतो. यातील भाषा, विचार आणि तत्त्वज्ञान हे पहिल्या तीन वेदांपेक्षा वेगळे आहेत. या वेदात अंत्यविधी, रोग बरे करणे, राक्षसांचा व शत्रूंचा नाश
करणे, राज्याभिषेकसमयी म्हणावयाचे मंत्र, कामशास्त्र, वनस्पतीशास्त्र इत्यादी अनेक विषय चर्चिले आहेत. अथर्ववेद म्हणजे आयुर्वेदशास्त्राचा प्रारंभ होय. यात अनेक रोग आणि त्यावरील औषधांची माहितीही वाचायला मिळते. अथर्ववेदात तंत्रज्ञानविषयक विचारही मांडलेले आढळतात. अशा रीतीने अथर्ववेदाचे स्वरूप हे सार्वत्रिक आहे. प्रत्येकाला सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, हा या वेदाचा उदात्त हेतू आहे.
ब्राह्मणे- वेदांतर निर्माण झालेले वैदिक वाङ्मय म्हणजे ब्राह्मणे ही होत. वेदानंतर वेदांचा अर्थ व यज्ञविधी लोकांना समजणे कठीण जाऊ लागले. म्हणून जे ग्रंथ निर्माण झाले, त्यांना ब्राह्मणे असे म्हणतात. ब्राह्म म्हणजे यज्ञकर्मामधील एखाद्या मुद्दय़ावर विद्वान पुरोहिताने केलेले स्पष्टीकरण, अशा स्पष्टीकरणाचा संग्रह ज्या ग्रंथात आहे ते, ग्रंथ म्हणजे ब्राह्मण्ये होत.
आरण्यके - ब्राह्मण ग्रंथाच्या शेवटच्या भागाला आरण्यके म्हणतात. ब्राह्मण ग्रंथ लिहूनही ज्या गोष्टींचे पुरेसे स्पष्टीकरण झाले नाही, अशा गोष्टींचे स्पष्टीकरण या ग्रंथात आढळते. यज्ञकर्म व त्यामागील पाश्र्वभूमी यांचा विचार निवांत जागी अरण्यात बसून होऊ लागला. हा विचार संग्रहित केलेले ग्रंथ म्हणजे आरण्यके होत. आरण्यके ग्रंथ म्हणजे ब्राह्मण्ये आणि उपनिषद ग्रंथ यातील दुवा समजले जातात.
उपनिषदे - वेदग्रंथाच्या निर्मितीनंतर यज्ञसंस्थेचे महत्त्व फारच वाढले. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी यज्ञाशिवाय दुसरा मार्ग शोधून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण त्याची शेवटची परिणती आपणास उपनिषदे या ग्रंथात झालेली आढळते. उपनिषद या शब्दाचा अर्थ (उप+नि+सद) म्हणजे गुरूच्या जवळ बसून ज्ञान-प्राप्ती करणे हा आहे. उपनिषद ग्रंथ ब्राह्मण ग्रंथाच्या शेवटी येतात. म्हणून यांना वेदांत असेही म्हणतात. उपनिषदांची एकूण संख्या किती आहे, हे सांगणे कठीण आहे. उपनिषदात विश्व, ब्रह्म, आत्मा आणि सत्य यांचा विचार केलेला आढळतो. विश्वाची निर्मिती ब्रह्मापासून झाली. ब्रह्म म्हणजेच अंतिम सत्य. हे ब्रह्म मानवात आत्मा या नावाने निवास करते. ब्रह्म म्हणजे आत्मा.
वेदांगे - वेदांचा विस्तार जास्त असून, आकलन होण्यास कठीण व मुखोद्गत असल्याने अवघड वाटते. अनेक विद्वान ऋषींनी हे ज्ञान सूत्ररूपात मांडले. तेच वेदांग म्हटले जाते. वेदांगे हा काही एक ग्रंथ नाही. तो एक सहा ग्रंथांचा संच आहे. प्रत्येक ग्रंथ हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी ही सहा वेदांगे आहेत.
शिक्षा - वेद पठणाचे व गायनाचे नियम, प्रत्येक मंत्रातील शब्दांचा उच्चार व आघात यासंबंधीची माहिती आणि त्यातील पदज्ञान शिक्षा व वेदांगात अंतर्भूत आहेत.
कल्पसूत्रे - मानवी जीवन नियमबद्ध करणारे अनेक आचार-विचार यज्ञ विधी, यज्ञ कुंड रचना इत्यादींची माहिती देणारे हे साहित्य होय. याचे चार विभाग आहेत- श्रोतसूत्र, गृहसूत्र, धर्मसूत्र, शुल्बसूत्र.
व्याकरण - वेदांची संस्कृत भाषा व तिची रचना समजून घेण्यासाठी व्याकरण शास्त्रात जन्मले. आज मात्र वैदिक व्याकरण उपलब्ध नाही. नंतरचा अष्टाध्यायी ग्रंथ आधारभूत आहे व त्याला वेद वाङ्मयाचे व्याकरण म्हणतात.
निघंटू - वेदातील कठीण शब्दांचा अर्थ सांगणारा निघंटू नावाचा शब्दकोश कश्यपहरींनी तयार केला होता.
निरुक्त - यात वैदिक शब्दांची उत्पत्ती व त्यांच्या अर्थाचे वर्णन केलेले आहे.
छंदशास्त्र - वैदिक मंत्राचे तालसुरात उच्चारण यात दिले आहे.
ज्योतिष - यज्ञ हे विशिष्ट काळात, विशिष्ट मुहूर्तावर करावयाचे असतात. सूर्य, चंद्र व आकाशातील इतर ग्रहांच्या गतीवरून ही कालगणना तयार करण्यात येते. त्यासंबंधीचे सर्वशास्त्रीय विवेचन या ग्रंथात करण्यात आले आहे.
उपवेद - या सहा ग्रंथात वैदिक वाङ्मयाची पूरक शास्त्रे म्हणता येतील. औषधोपचाराविषयी माहिती पुरविणारा ग्रंथ आयुर्वेद तर युद्ध कलाविषयक माहितीचे शास्त्र म्हणजे धनुर्वेद संगीत कलेची उकल करणारे शास्त्र गांधर्ववेद स्थापत्य कलाशास्त्रांची माहिती पुरविणारे शास्त्र हे शिल्पवेद.
वैदिक काळातील मंत्रिमंडळाची पदे व कर्तव्ये -
१) राजन्य - या पदावर राजपुत्र राज परिवार सरदार यांपैकी क्षत्रिय व्यक्ती असे.
२) माहिषी - पट्टराणी हे पद देत तिने नाजूक बाबींवर व संकटकालीन सल्ला द्यावा.
३) पुरोहित - हा राजाला धर्म प्रमुख राहून व संकटकाळी मदत करणारा.
४) सेनानी - हा सन्य प्रमुख असे.
५) सूत - हे राजाचे खासगी अधिकारी व सारथी.
६) संग्रहित - हा अर्थ व्यवहार सांभाळणारा कोषाध्यक्ष होय.
७) भागदूत - हा कर वसुली करणारा.
८) ग्रामणी - हा ग्रामप्रमुख या पदाचे कार्य पाहत असे.
९) अक्षवप- हा अधिकारी जुगार निरीक्षक व नियंत्रक होता.
आश्रमव्यवस्था
ब्रह्मचर्याश्रम (२५ वर्षे)- जीवनाच्या या प्रथमावस्थेचा आरंभ वयाच्या ८ ते १२ व्या वर्षी मौजी बंधनानंतर ज्ञानार्जनासाठी गुरुग्रही प्रवेश करून होत असे. तेथे अनेक समवयस्कांसमवेत गुरुसेवा व आज्ञापालन करून हे ब्रह्मचारी राहात.
गृहस्थाश्रम (२६ ते ५० वर्षे)- ही ऐन तारुण्याची अवस्था होय. संसारी जीवनाची ही प्रथमावस्था होय. विवाह व वैवाहिक जीवनाची जबाबदारी पेलण्याचे हे वय. पित्याला वानप्रस्थाश्रमी जाण्यास मदत करणे व स्वत: गृहस्थाश्रमाची जबाबदारी पेलणे हे आद्य कर्तव्य होते.
वानप्रस्थाश्रम (५१ ते ७५ वर्षे )- वृद्धावस्थेपूर्वीची ही प्रौढ अवस्था होय. संसार मोह त्यागून जगण्याचा हा प्रयत्न, ऐहिक बंधने त्यागून पारलौकिक सुखासाठी कष्ट सोसण्याची ही पूर्वतयारी होय. या सवयींमुळे संन्यासाश्रमाची वाट मोकळी होते असा समज होता.
संन्यासाश्रम (७६ ते १०० वर्षे) - सर्व मायेचे पाश तोडून वैराग्यवृत्ती पत्करून एकांतवास पत्करला की, षङ्रिपूंचे दमन होते. गुरु ऋणमुक्ती, देव स्मरण, चिंतन, ध्यान व मोक्षाकडे नेणारा हा आश्रम होय.

प्राचीन भारताचा इतिहास

इ.स.पूर्व सहाव्या शतकात राजसत्तांचा प्रभाव कमी होऊन गणराज्यांचे प्रभुत्व वाढत गेले. जनपदाची जागा महाजनपदांनी घेतलेली दिसते. उत्तर भारतातील सप्तनद्यांच्या परिसरापासून ते महाराष्ट्रातल्या गोदावरी नदीच्या खोऱ्यापर्यंतच्या विस्तृत प्रदेशांत ही महाजनपदे विखुरलेली होती.
० इसवीसनपूर्व सहाव्या शतकातल्या भारतातील राजकीय स्थितीचे अत्यंत स्पष्ट असे विवेचन महापरिनिर्वाणसूत्र या बौद्ध ग्रंथात आढळते.
० सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी काही काळ उत्तर भारतात काही प्रबळ अशी महाजनपदे उदयाला आली. या महाजनपदांची माहिती अंगुत्तरनिकाय, दिघनिकाय या निकाय ग्रंथांतून, दीपवंश आणि महावंश या महाकाव्यातून आणि महापरिनिर्वाणसूत्र या ग्रंथातून आढळते.
० तत्कालीन भारतात एकूण १६ महाजनपदे, काही गणराज्ये आणि टोळीराज्ये होती. या राज्यांपकी अनेकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या राज्याराज्यांमध्ये कधी तणावाचे तर कधी सलोख्याचे संबंध असत. सत्तासंघर्षही होताच.
महाजनपदे
महाजनपदे खालीलप्रमाणे आहेत-
१. काशी - हे पुरातन महाजनपद आहे. याचे बौद्ध जातक कथांमध्ये वर्णन आहे. सध्याच्या वाराणसी या शहाराजवळ हे राज्य होते. काशीच्या शेजारी कोशलचे राज्य होते.
२. कोशल- सध्याच्या उत्तर प्रदेशातील अवध परिसरात हे महाजनपद होते. काशी शाक्य जमातीचा पराभव या राज्याने केला होता. याचा विस्तार करण्यामध्ये प्रसेनजीत राजाचा मोठा वाटा होता.
३. अंग - सध्याच्या बिहार राज्यातील भागलपूर व मोंगीर जिह्य़ात हे महाजनपद होते. चंपा हे राजधानीचे ठिकाण होते. व्यापारउदिमासाठी प्रसिद्ध होते. बिंबिसाराने अंग हे राज्य मगध साम्राज्यात जिंकून विलीन केले.
४. वज्जी किंवा वृज्जी - सध्याच्या उत्तर बिहारमध्ये आठ
जमातींचे हे एक गणतंत्र होते. वैशाली ही या गणतंत्राची राजधानी होती. वज्जीची राजधानी मिथिला होती. वैशाली ही लिच्छिवीची राजधानी होती. वर्धमान महावीराची आई लिच्छिवी वंशातली होती. वैशाली येथे दुसरी बौद्ध परिषद पार पडली होती.
५. मल्ल - प्रजातंत्रीय राज्य म्हणून प्रसिद्ध. या राज्याच्या कुशीनगर आणि पावा या दोन राजधान्या होत्या. कुशीनगर येथे गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले.
६. चेदी - सध्याच्या बुंदेल खंड भागात हे राज्य होते.
७. वत्स - सध्याच्या अलाहाबादजवळ होते. याची कौशम्बी ही राजधानी होती. उदयन हा पराक्रमी राजा या राज्यात होऊन गेला.
८. कुरू - सध्याच्या दिल्ली मेरठ परिसरातील ठिकाण. येथे कुरू जमातीचे राज्य होते. वैदिक काळातच याला महत्त्व आले होते.
९. पांचाल- दिल्लीच्या उत्तरेस व पूर्वेस हिमालयाच्या पायथ्यापासून चंबळपर्यंत पांचालांचे राज्य पसरले होते.
१०. मत्स्य - आधुनिक राजस्थानातील जयपूर, भरतपूर, अल्वा येथे हे राज्य होते.
११. शूरसेन - मथुरा याची राजधानी होती.
१२. अस्मक किंवा अश्मक - अवंत राज्याच्या शेजारीचे राज्य व गोदावरी नदीच्या तटापर्यंत पसरलेले होते. हे राज्य अवंती राज्यात विलीन झाले.
१३. गांधार - सध्याच्या पेशावर व रावळिपडी या ठिकाणी हे राज्य होते. तक्षशिला याची राजधानी होती.
१४. कंबोज - आधुनिक पाकिस्तान व गुजरातमधील भूप्रदेश मिळून हे राज्य होते.
१५. अवंती - उज्जन ही याची राजधानी होती.
१६. मगध - हे बिहार राज्यातील पाटणा आणि गया या जिल्ह्य़ात होते. मगधाचा उदय सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून झाला.
मगध साम्राज्य
बौद्ध काळातील १६ महाजनपदे आणि गणराज या स्वरूपातील राजकीय संरचना काही शतके अस्तित्वात राहिली, गणराज्याची भरभराट झाली. मात्र नंतरच्या काळात सत्ता विस्तारत गेली. राज्यांची साम्राज्ये झाली, सामाजिक मानसिकता बदलत गेली. या बदलत्या विचाराचे चित्र कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मोठय़ा चिकित्सकपणे रेखाटलेले आहे. प्राचीन भारतातील सत्तेच्या ध्रुवीकरण प्रक्रियेत मगध राज्य यशस्वी ठरले. बौद्ध ग्रंथ महावंश यात मगधाच्या इतिहासाची अधिक विश्वसनीय माहिती मिळते. त्यानुसार मगध राज्यावर पुढील राज्यांनी राज्य केले- बिंबिसार, अजातशत्रू, उदयभद्र / उदयिन, अनिरुद्ध, मूड, नागदशक, शिशूनाग, कालाशोक किंवा काकवर्णी. कालाशोकाचे दहा पुत्र बिंबिसार व अजातशत्रू हे सिद्धार्थ गौतम बुद्धाचे समकालीन होते.
मगधाची प्रारंभिक प्रशासन यंत्रणा - मगध जनपदातील ग्रामांची प्रतिनिधी सभा - ग्रामक. तीन प्रकारचे महामात्र प्रशासनावर नियंत्रण ठेवून असत. सभाथ्थक, व्यावहारिक, सेनानायक हे तीन महामात्र मगध जनपदाच्या केंद्रीय प्रशासन यंत्रणेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. प्राचीन भारतातील प्रशासनाची मुहूर्तमेढच मगधात रोवली गेली.
१. बिंबिसार ( इ.स. पूर्व ५४४ - ४९२) - बिंबिसार हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. याने विजय मिळवणे व आक्रमण करणे या धोरणाचा अवलंब केला. वैवाहिक संबंधातून बिंबिसाराने आपले स्थान अधिक भक्कम केले. राजगीर मगध राज्याची राजधानी होती. या काळात राजगीरचे नाव गिरीवज्र होते. तसेच गिरीव्रज पाच टेकडय़ाने वेढलेले होते.
२. अजातशत्रू - अजातशत्रू हा बिंबिसाराचा मुलगा होता व बिंबिसारनंतर याने मगधावर राज्य केले. अजातशत्रूने बापाला ठार मारून राज्य बळकावले. याच्या काळात मगध सत्ता परमोच्च शिखरावर पोचली. राज्यविस्तारासाठी आक्रमक धोरण अंवलंबिले व नात्यांचाही विचार केला नाही. अजातशत्रूने वैशाली राज्याचा नाश केला. तसेच काशी व वैशाली मगध साम्राज्यात सामावून घेतले. याच्या काळात पहिली धर्म परिषद राजग्रह या नगरीत घडली. बौद्ध ग्रंथातून या परिषदेचे सविस्तर वर्णन आढळते. अजातशत्रूनंतर मगध सत्तेला ग्रहण लागले. राज्याची वाटचाल अधोगतीकडे सुरू झाली. कर्तृत्वहीन राजे नुसते सत्तापिपासू बनले आणि राज्यसत्तेसाठी सिंहासनप्राप्तीसाठी वाटेल ते करू लागले.
३. उदयिन ( इ.स. पूर्व ४६० ते ४४४) - अजातशत्रूनंतर हा मगधच्या गादीवर आला. उदयिननंतर शिशूनाग घराणे मगधच्या राजसत्तेवर आले, यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान उज्जन राज्याचा पाडाव शिशूनाग घराण्याने केला आणि १०० वर्षांचे मगध व उज्जनमधील जुने वैर संपुष्टात आले. शिशूनाग घराण्याच्या नंतर नंद घराण्यांचे मगधावर राज्य आले. तसेच नंदाकडे अफाट संपत्ती होती आणि ते कमालीचे शक्तिशाली होते. मगधाचे यश या राज्यात झालेले महत्त्वाकांक्षी व साहसी राजांचे कार्य यात होते. तसेच भौगोलिक घटकही मगध साम्राज्याच्या उदयाला कारणीभूत ठरले. लोखंडाच्या समृद्ध खाणी याच भागात होत्या. यामुळे प्रभावी शस्त्रे सहज बनवता येत असत.
मगधातील नंदसत्ता - नंदसत्तेच्या रूपाने भारतातील पहिली क्षत्रियेतर सत्ता उदयाला आली. वर्णव्यवस्थेतील चौकट भेदण्याचा हा पहिला प्रयत्न म्हणावा लागेल. इ.स. पूर्व २६४ ते इ.स. पूर्व २२४ अशी ४० वर्षे नंदांनी राज्य केले. पौराणिक उल्लेखानुसार महापद्मनंदाने नंद घराण्याची स्थापना केली. मात्र काही बौद्ध ग्रंथांत नंद घराण्याचा संस्थापक म्हणून उग्रसेनाचे नाव येते.
महापद्मनंद - भारतातील पहिला सम्राट - महापद्मनंद हा अत्यंत शूर पराक्रमी असा होता. त्याने सत्तेचे ध्रुवीकरण घडवून आणले. त्याने क्षत्रिय सत्ता नामशेष करून त्याची जनपदे नंद साम्राज्यात समाविष्ट केलीत. बौद्ध काळात सुरू झालेली प्रस्थापितांविरुद्धची क्रांती नंद साम्राज्याच्या रूपाने राजकीय स्थित्यंतरात रूपांतरित झाली.
महाबोधी वंश - या बोधीवंशातून नंद घराण्यातील या राजांची नावे आढळतात. ती पुढीलप्रमाणे- उग्रसेन ( महापद्मनंद, पाण्डूक, पाण्डूगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गोवीशाणक, दशसिद्धक, कैवर्त आणि धनानंद. यांपकी पहिला महापद्मनंद आणि शेवटचा धनानंद यांविषयी सविस्तर माहिती मिळते.
धनानंद - श्रेष्ठ सम्राट. नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद यांविषयी सविस्तर माहिती मिळते. याच्या कार्यकीर्दीत अलेक्झांडर याने भारतावर आक्रमण केले. आक्रमक सन्याबरोबर ग्रीक इतिहासकारांनी धनानंदबाबत माहिती लिहून ठेवली आहे. इ.स. पूर्व ३२७ ते ३२५ या काळात म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमण वर्षांत धनानंद सत्तेवर होता. पाटलीपुत्र ही त्याची राजधानी होती. त्याच्याकडे प्रचंड लष्करी सामथ्र्य होते, मात्र राजा हा दुर्बल होता. त्याच्या राज्यातील प्रजाजन त्याचा द्वेष करीत असत. तो धनाचा प्रचंड लोभी होता. त्याने प्रजाजनांना छळले होते. त्याच्या राज्याला लोक कंटाळले होते. थोडक्यात तो प्रजाजनांसाठी अप्रिय होता. शेवटी त्याची सत्ता उलथून टाकण्यात आली. इ.स. पूर्व ३२४ मध्ये चंद्रगुप्ताने नंदसम्राटाविरुद्ध बंड केले व मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
मौर्य साम्राज्य
मौर्य साम्राज्याच्या अभ्यासाचे स्रोत -
अ) साहित्य -
१. अष्टाध्यायी- पाणिनीने लिहिले, ते सर्वात जुने व्याकरणाचे पुस्तक आहे.
२. अर्थशास्त्र - हे पुस्तक आर्य चाणक्य / कौंटिल्य याने लिहिले, असे मानले जाते. या पुस्तकात वर्णन केलेल्या प्रसंगावरून मौर्य काळातील परिस्थितीचा अंदाज येतो.
३. महाभाष्य - पाणिनीच्या अष्टाध्यायीवर ही लिहिलेली समीक्षा आहे, हे पुस्तक पुश्यमित्र संघाच्या दरबारी असलेल्या पुरोहित पतंजली यांनी लिहिले आहे. मौर्य साम्रज्याचा शेवट का झाला असावा, याबाबत कारणांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
४. परिशिष्ट पर्वत - हेमचंद्र सुरी यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून चंद्रगुप्त मौर्याबाबत माहिती मिळते.
५. इंडिका - चंद्रगुप्ताच्या काळात सेल्युकस निकेटरचा राजदूत म्हणून आलेल्या मेगॅस्थेनिस याने हे पुस्तक लिहिले तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची कल्पना या पुस्तकावरून येते. याशिवाय शिलालेख, स्तंभालेख, मातीची विशिष्ट भांडी, स्तूप, गुंफा इ. साधनांच्या माध्यमातून मौर्य कालखंडातील इतिहास जाणून घेता येतो.
चंद्रगुप्त मौर्य - मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली, त्याच्या कुळाविषयी वेगवेगळी मते व्यक्त केली गेली आहेत. ब्राह्मणी परंपरेनुसार असे मानले जाते की, चंद्रगुप्त मौर्य मुरा या नंदाच्या दरबारातील शूद्र स्त्रीच्या पोटी जन्माला आला तर बौद्ध परंपरेनुसार असे मानले जाते की, चंद्रगुप्ताचा जन्म क्षत्रिय वंशात झाला.
मौर्य साम्राज्याचा भौगोलिक विस्तार - जस्टिन व प्लूटार्क या ग्रीक इतिहासकारांनी चंद्रगुप्ताने निर्माण केलेल्या साम्राज्याची माहिती दिली आहे. जस्टिन या ग्रीक लेखकाने असे लिहिले आहे की, चंद्रगुप्त मौर्याने आपल्या विशाल सन्याच्या साह्य़ाने संपूर्ण भारत पादाक्रांत केला. मौर्याच्या साम्राज्यात बंगाल, ओरिसाचा बराच भाग, बिहार पश्चिम व उत्तर भारत, दख्खन याचा समावेश होता.
मौर्याचे प्रशासन - कौटिल्याचे अर्थशास्त्र व मेगॅस्थेनिसच्या इंडिका या ग्रंथातून मौर्य साम्राज्य व त्याच्या प्रशासन याची कल्पना येते. पाटलीपुत्र हे मौर्याच्या राजधानीचे ठिकाण होते, सर्व सत्ता राज्याच्या हातात होती. कौटिल्यानुसार राजा धर्मप्रवर्तक किंवा समाज व्यवस्थापन करणारा होता. मेगॅस्थेनिसच्या म्हणण्यानुसार, राज्याला सहाय्य करण्यासाठी एक परिषद होती, या परिषदेत विद्वान लोक होते. याच्या सल्ल्याचे बंधन राज्यावर नव्हते. साम्राज्याचे अनेक प्रांतांत लहान विभाग केले जात असत. ही प्रशासन व्यवस्था शहरी व ग्रामीण भागासाठी होती. नगर व शहरी प्रशासनासाठी सहा समित्या होत्या. प्रत्येक समितीत पाच सदस्य असत. शहाराची स्वच्छता राखणे. जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, वजन व मापे नियमित करणे यांसारखी कामे या समित्यांमार्फत केली जात असत. विक्रीसाठी शहरात आलेल्या प्रत्येक वस्तूवर पथकर लावला जात असे, नसर्गिक साधनसंपत्तीवर राज्याचा एकाधिकार होता. मेगॅस्थेनिसच्या लिखाणावरून, सन्याची व्यवस्था पाहण्यासाठी ३० अधिकाऱ्यांचे मंडळ होते. हे अधिकारी मंडळ पाच अधिकारी याप्रमाणे सहा समित्यांत स्थापन केलेले होते. सन्याची सहा अंगे होती- पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, रथदळ, नौदल, वाहतूक आणि त्यांचे काम.
बिंदुसार - चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा राज्यावर आला. बिंदुसाराच्या कारकीर्दीविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्याने ग्रीकांशी संबंध चालू ठेवले. बिंदुसाराचा उल्लेख ग्रीक लेखकांनी अमित्रघट असा केला आहे. याचा अर्थ प्रतिस्पध्र्याचा नाश करणारा असा होतो. याच्या काळात तक्षशिला येथे बंड झाले होते. हे बंड मोडण्यासाठी अशोकाला पाठवले होते. त्याने सिरीयाचा राजा अ‍ॅन्टोओक्स पहिला याला मदिरा, अंजीर आणि तत्वेले पाठविण्याची विनंती केली होती.
अशोक - बिंदुसाराला अनेक पुत्र होते. त्यांपकी अशोक याने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर िबदुसाराची गादी काबीज केली. महावंश या ग्रंथात असे नमूद केले आहे की, अशोकाने आपल्या ९९ भावांना ठार मारून राज्याची गादी प्राप्त केली, प्रत्यक्ष लोकांच्या भाषेत बोलणारा अशोक हा सर्वात पहिला राजा होता.
किलग युद्ध - या युद्धात एक लाख लोक मारले गेले. जवळजवळ दीड लाख लोक बंदी बनवले गेले. कित्येक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या युद्धानंतर अशोकाला तीव्र पश्चाताप झाला. किलग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने बौद्ध धर्माप्रमाणे आचरणास सुरुवात केली. बौद्ध धर्मातील मतभेद दूर व्हावेत आणि धर्माला पुन्हा उजाळा मिळावा, म्हणून अशोकाने पाटलीपुत्र येथे तिसरी धर्म परिषद बोलावली. या धर्म परिषदेचे अध्यक्षस्थान मोगलीपुत्र तिष्य याने स्वीकारले होते. त्याने दक्षिण भारत श्रीलंका, म्यानमार व इतर देशांत धर्मापदेशक पाठवले होते. अशोकाने आपल्या राज्यात ठिकठिकाणी शिलालेख व स्तंभालेख कोरून ठेवले, या शिलालेखावरून त्याचा राज्यकारभार व त्याची प्रजेच्या कल्याणाविषयीची तळमळ याची माहिती मिळते.
सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. त्याच्यानंतर सत्तेवर आलेले मौर्य राजे कमकुवत होते, त्यांच्याकडे कर्तबगारीचा अभाव होता, अशोकानंतर ५० वर्षांतच मौर्य साम्राज्याचा विनाश झाला. शेवटचा मौर्य राजा बृहद्रश याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने खून करवला व स्वत:च गादी बळकावली. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील पहिले देशव्यापी साम्राज्य होते.
मौर्यकालीन आर्थिक जीवन
मौर्य काळात आर्थिक घडामोडीसाठी २७ अध्यक्षांची नेमणूक केली जात होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार व्यापार, वाणिज्य, वजनमापे, सूत काढणे यांसारखी कारागिरी खाणकाम यांचे नियंत्रण या २७ अध्यक्षांमार्फत केले जात असे. मेगॅस्थेनिसच्या म्हणण्यानुसार मौर्य साम्राज्यात गुलाम आढळले नाहीत. मात्र वैदिक काळापासून गुलामांचा घरगुती वापर होत होता. अशोकाने बंदी बनवून आणलेले युद्धकैदी शेतीवरील कामासाठी नेमलेले होते. मौर्य काळात जलमार्गाचा वापर केला जात असे. पाटलीपुत्राच्या चारही दिशांना जाण्यासाठी जलमार्ग होता. करव्यवस्था ही मौर्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग होता.
मौर्यानी करनिर्धारणाला महत्त्व दिले होते. करनिर्धारणाची जबाबदारी संहर्ता या अधिकाऱ्यावर होती. याबाबत तो सर्वोच्च अधिकारी होता. खनिजाचा व भंडाराचा प्रमुख अधिकारी सन्निधता होता. करवसुली ही धान्याच्या स्वरूपात होत असे. करवसुली अधिकाऱ्यांना रोखीव वेतन दिले जात असे. एरियन या ग्रीक लेखकाने शहरांची संख्या अगणित होती, असे प्रतिपादित केलेले आहे. या काळात विटा व लाकूड यांचा घर बांधण्यासाठी वापर केला जात असे. लोखंडापासून पोलाद बनवण्याची कला ही मौर्यानीच प्रस्थापित केली, पुढे ती देशाच्या अन्य भागांत पसरली.
मौर्याची कलाशैली
दगडी बांधकाम मौर्यानी मोठय़ा प्रमाणात केले. आधुनिक पाटना शहराच्या सरहद्दीवर असलेले कुंभ्रहर येथे दगडी स्तंभांच्या व खुंटाचे अवशेष आढळतात. यांच्या वरील भागात सिंह व बल यांचे चित्र काढण्यात आले आहे. कुंभ्रहर येथील प्रत्येक स्तंभ फिकट रंगाच्या व एकाच वालुकाश्मात बनविलेले आहे. बौद्ध भिक्षुकांसाठी राहण्याची सोय दगड कोरून निर्माण केलेल्या गुहांमध्ये होती.
मौर्योत्तर काळातील परकीय सत्ता
१. इंडो ग्रीक - पहिले आक्रमण ग्रीकांनी केले व हे इंडो ग्रीक म्हणून ओळखले जाते.
मिनांदर (इ.स.पूर्व १६५ ते इ.स.पूर्व १४५) याला मिलिंद म्हणूनही ओळखले जाते. नागसेन किंवा नागार्जुनाने मिलिंदाचे धर्मातर करून बौद्ध धर्माची दीक्षा दिली. मिलिंदाने नागार्जुनाला बौद्ध धर्माशी निगडित जे प्रश्न विचारलेत व नागार्जुनाने जी उत्तरे दिलीत ती मिलिंदपन्हो या पुस्तकात नमूद केलेली आहेत. सुवर्णाची नाणी प्रथमच इंडो-ग्रीकांनी भारतात आणली होती.
२. शक - ग्रीकांनंतर शकांनी भारतावर आक्रमण केले. शकांच्या पाच शाखा होत्या. त्यांपकी पाचव्या शाखेने दख्खनच्या उत्तर भारतात सत्ता प्रस्थापित केली. शकांनी मोठय़ा प्रमाणात चांदीची नाणी वापरात आणली. पहिला रुद्रदमन ( इ.स. १३० ते १५० ) हा सर्वात प्रसिद्ध शक राजा होता. त्याचे राज्य सिंध, गुजरात, कोकण, नर्मदेचे खोरे, काठेवाड भागात होते. रुद्रदमन याने सुदर्शन तलावाची डागडुजी केली. हा तलाव जलसिंचनासाठी प्रसिद्ध होता. रुद्रदमनला संस्कृत भाषेची आवड होती.
३. पार्थियन - पार्शियनांमुळे शकांचे वर्चस्व नष्ट झाले.
४. कुषाण - पार्शियनांपाठोपाठ कुषाण भारतात आले, ही भटकी जमात होती. कुषाणांनी हिंदकुश पर्वत ओलांडून गांधार प्रदेश काबीज केला. कुषाणांनी सिंधू नदीच्या दक्षिण खोऱ्यात व गंगेच्या विशाल प्रदेशावर आपले राज्य स्थापन केले. कुषाणांनंतर कनिष्क घराणे सत्तेवर आले.
कनिष्क घराणे - कनिष्क घराण्याने शुद्ध धातूच्या असंख्य सुवर्णमुद्रा प्रचलित केल्या आहेत. कनिष्क हा प्रसिद्ध कुषाण राजा होता. कनिष्काने बौद्ध धर्माला पाठिंबा दिला होता. कनिष्काने चौथी बौद्ध परिषद काश्मीरमध्ये भरविली होती. या परिषदेत हिनयान पंथाच्या तत्त्वांना अंतिम स्वरूप देण्यात आले.

Sunday 12 May 2013

अमेरिकी निवडणूक



अमेरिकेतील अध्यक्षीयपदाची निवडणूक दर चार वर्षांनी एकदा होते. ही निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारीच होते.अमेरिकेचा नागरिक हा कटिबद्ध इलेक्टर्सना आपले मत देतो आणि मग असे 'कटिबद्ध इलेक्टर्स' औपचारिकपणे आपली मते अध्यक्षीय उमेदवारास देतात.

मंगळवारच का?
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मतदानासाठी अनेक शेतकरी 'बग्ग्यांमधून' मतदानासाठी येत असत, यांपैकी अनेकांना फार दूर अंतरावरून यावे लागत असे. शनिवार हा आठवडय़ातील कामाचा अखेरचा दिवस असे आणि रविवार प्रार्थनेचा. परिणामी या दिवशी लोक प्रवास टाळत असत. बुधवारी आठवडय़ाच्या बाजाराचा दिवस असे. म्हणून पहिल्या सोमवारनंतर येणारा मंगळवार हा निवडणुकीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.

काय आहे इलेक्टोरल कॉलेज ?
अमेरिकेत एकूण ५० राज्ये आहेत. अमेरिकेच्या 'प्रतिनिधीगृहातील' प्रत्येक राज्याच्या प्रतिनिधी संख्येनुसार त्या-त्या राज्याच्या 'इलेक्टर्स'ची संख्या निर्धारित केली जाते. याव्यतिरिक्त कोलंबिया या जिल्ह्य़ाकरिता ३ इलेक्टर्स निर्धारित करण्यात आले आहेत. या प्रत्येक 'इलेक्टर'ला एक मत असते. यानुसार प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी संख्येइतकी मते प्रत्येक राज्याला असतात. याशिवाय प्रत्येक राज्याच्या सिनेटमधील २ प्रतिनिधींना आपले प्रत्येकी एक मत या निवडणुकीत देता येते. या सर्वाचे मिळून 'इलेक्टोरल कॉलेज' होते. सध्या एकूण ५३८ इलेक्टर्स असून २७० किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्टर्सची मते मिळवणारा उमेदवार विजयी म्हणून घोषित केला जातो.

पॉप्युलर व्होट
जेव्हा प्रत्येक राज्यातील मतदार आपल्या पसंतीनुसार उमेदवारास मत देतात, तेव्हा प्रत्यक्षात ते आपल्या राज्यातील प्रतिनिधीने - 'इलेक्टर'ने नेमके कोणाला मत द्यावे हेच सुचवीत असतात. उदाहरणार्थ जर मतदाराने रिपब्लिक पक्षाच्या उमेदवारास मत दिले तर याचा अर्थ रिपब्लिक पक्षालाच मत देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या इलेक्टरला (कटिबद्ध इलेक्टर्स) त्याने मत दिले असा होतो. त्यामुळेच एखाद्या उमेदवाराने जर 'पॉप्युलर व्होटस्' जिंकली तर त्याने त्या राज्यातील सर्व इलेक्टर्सची मते जिंकली असा त्याचा अर्थ होतो.

डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढवच का ?
१८२८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रतिनिधी असलेल्या अँड्रय़ू जॅकसनला त्याच्या 'आता लोकांना राज्य करू द्या' या मतामुळे त्याचे टीकाकार 'जॅकॅस' (जॅक - गाढव) म्हणून संबोधत असत. याचा वापर जॅक्सनने पुढे मोठय़ा खुबीने केला. त्याने आपल्या प्रचारादरम्यान प्रतीक म्हणून 'गाढव' हेच चिन्ह वापरले.